राजापूर : कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिरात रथसप्तमी उत्सव सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमंदिर म्हणून गणल्या जाणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरातील उत्सव २३ फेब्रुवारीपर्यंत साजरा होणार आहे. मंदिरात गुरुवारी सत्यसूर्य पूजा करण्यात आली. चांदीच्या घोड्यांवर आरूढ श्री कनकादित्यची मूर्ती पूजेवेळी स्थापित करण्यात आली होती. रथसप्तमी उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे उत्सव साजरा करताना कोरोनाचे निर्बंध पाळण्यावर मंदिराच्या व्यवस्थापनाने भर दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 20-Feb-21