रत्नागिरी : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढू लागला. त्याला आताच अटकाव करणे गरजेचे आहे. याकरिता शासनाने उपाय सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी पालिका आणि पोलिस यंत्रणा यांचे संयुक्त विद्यमाने शहर परिसरामध्ये तपासणी सुरू केली आहे. ग्राहकांनी वस्तू खरेदी करण्याकरिता बाजारात येताना मास्क लावणे, सोशल डिस्टसिंग आणि सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तशी तपासणी पथकाने बाजारामध्ये सुरवात केली आहे. बाजार परिसरामध्ये फिरणाऱ्या लोकांनी तसेच बाजारामध्ये व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांनी कोरोना नियमांचे पालन करावयाचे आहे. मागील लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने सर्व नियमांचे अवलंबन करून व्यापारी आणि ग्राहक शिस्त पाळत होते, तशा पद्धतीने सुरू ठेवायचे आहे. ‘नियम पाळा, दंड टाळा’ हे आपल्या स्वास्थ्याकरिताच आहे, असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 22-Feb-21