पालघर : पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रीची दुकानं आणि पोल्ट्रीफार्म 21 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. त्याशिवाय, एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्री दुकानांवरील कोंबड्या, अंडी, खाजगी पक्षी तसेच पशुखाद्यची विल्हेवाट लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालघर शहरातील सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्रीत अचानक 45 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बर्ड फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचं सिद्ध झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 23-Feb-21