रत्नागिरी : ‘जिल्ह्यात हज हाऊस उभारण्याचा माझा संकल्प होता. मात्र ते शक्य नसल्याने बांद्राच्या धर्तीवर रत्नागिरीत ‘उर्दूभवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मुस्लिम बांधवांना मोठा फायदा होईल. तसेच 10 कोटी रुपये खर्च करून मोठ्या शहराप्रमाणे रत्नागिरीत ‘ऑफिसर क्लब’ उभारण्यात येणार आहे. ऑफिसर क्लब असले तरी मासिक शुल्क भरून सर्वांसाठी ते उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीत सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बिओटी तत्वावर उभारण्याचा येणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडवकवाड आदी उपस्थित होते. ते म्हणाले, मुस्लिम समाजासाठी उर्दूभवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. बांद्रामध्ये उर्दुभवन आहे. त्या धर्तीवर रत्नागिरीत ते उभारले जाईल. ऊर्दू भाषेच्या संवर्धासाठी त्याचा फायदा होणार आहे. आज मराठी भाषा गौरवदिन आहे. त्यानित्ताने महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयात इंग्रजीमधून शिक्षण घेत असताना मराठी भाषेचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. जे जे स्कुल ऑफ आर्टस् आणि पालिकेच्या माध्यातून पर्यटन वाढीसाठी 2 कोटी रुपये खर्च करून आकर्षक सुशोभिकरण करण्यात येणार आहे. गणपतीपुळ्याध्ये बोटींग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे येणार आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. बांधा, वापरा, हस्तांतरीत करा या बीओटी तत्वार ते उभारले जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 01-Mar-21