उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदल परिसरात आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांकडून या प्रकाराबद्दल शंका व्यक्त करण्यात आली असून भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून विचारला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:00 PM 06-Mar-21