रत्नागिरी : खेड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून नेहमीच चर्चेत राहिलेल्या पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की यांची रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत आवाज उठवून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची जोरदार मागणी केली होती. या मागणी दरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल रामदास कदम यांनी माफी मागावी अशी मागणी देखील मनसे महिला आघाडीने केली होती. सुवर्ण पत्की यांच्या या बदलीबाबत दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत होत्या. अशा पद्धतीने करण्यात आलेल्या बदलीमुळे पोलीस दलातून देखील नाराजीचा सूर ऐकायला मिळत होता. आता रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण पत्की यांचा हा निरोप समारंभ पार पडला व या कार्यक्रमात त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:29 AM 24/Mar/2021