नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धीर दिला आहे. तुम्ही आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर भर द्या, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना धीर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनावरून सुरू असलेल्या राजकारणाकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे यांना आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर लक्ष द्या, असा सल्ला दिला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:42 PM 09-Apr-21