देशात लोकसंख्या बघून कोरोना लसीचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लस कमी पडली नसती, असे मत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. राज्याची लोकसंख्या किती हे लक्षात घेऊन त्या प्रमाणात प्रत्येक राज्याला कोरोना लसीचे वितरण करण्यात यावे. महाराष्ट्राला जास्त किंवा इतर राज्याला कमी असे वाटप करणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 09-Apr-21