‘पहचान कौन?’ म्हणत अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या…

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच जनतेलाच ‘पहचान कौन?’ असं म्हणत एक कोड घातलं आहे. “ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही” अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here