संभाजी भिडेंच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले…

0

सातारा : राज्यातील कोरोनाची स्थिती, लसीकरण मोहीम, लसींचा तुटवडा यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसे जगायच्या लायकीची नाहीत, असे धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन’, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:42 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here