साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट, यात्रेनंतर गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

सातारा : राज्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. सरकारने गर्दी टाळा, सार्वजनिक कार्यक्रम, सभा आयोजित करू नका असं सांगूनही नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. साताऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण वाढत आहेत. दरम्यान, वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा गावकऱ्यांच्या अंगलट आली असून आतापर्यंत या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनानंतरही संसर्ग वाढत आहे. साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊन तसेच आठवडाभर मिनी लॉकडाऊन असूनही संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागापुढे संसर्ग कसा रोखायचा याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शुन्य मृत्यू दरावरून आता कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढून १४ वर गेले आहे. जिल्हा प्रशासनाचे जमावबंदी आदेश लागू असतानाही बंदी झुगारन वाई तालुक्यातील बावधन गावाने आपली बगाड यात्रा साजरी केली होती. बावधन परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्याचाही समावेश आहे. वाई तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडाही वाढू लागला आहे. आता आरोग्य यंत्रणेने वाई तालुक्यात लक्ष केंद्रीत करून येथील साखळी तोडणे गरजेचे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here