“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”

0

पंढरपूर : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा, असं विधान भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला पहिल्यांदाच थेटपणे अजित पवारांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस त्यांच्या सभेत अजितदादांची नक्कल केली होती. त्यावरून आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर…असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. फडणवीसांनी पावसात सभा घेतलेल्याचाही अजितदादांनी समाचार घेतला. तुम्ही कुठे अन् साहेब कुठे असं सांगत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 15-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here