देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव (कोंडकदम) ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्तच रहावा, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसीबाबत असलेले गैरसमज दूर करून घेत ग्रामस्थांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. एकाच दिवशी १४० जणांचे लसीकरण करून घेतले आहे. गावच्या सरपंच माधवी प्रमोद अधटराव अणि उपसरपंच रूपेश माने यांच्या नेतृत्वाखाली तुळसणी उपकेंद्रात ४५ वर्षांवरील तब्बल १४० ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले. असा उपक्रम करणारी आंबव ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 17-Apr-21