पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

0

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्च स्तरीय बैठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. यानंतर, कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी सर्व राज्यांना, अॅडव्हान्समध्ये 3 आठवड्यांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. तसेच गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी बाजारांमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींची आज सायंकाळी 6 वाजता फार्मा कंपन्यांसोबत बैठक :
देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बाठक करणार आहेत. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:07 PM 20-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here