साडवली : देवरूख-मार्लेश्वर मार्गालगत असणाऱ्या निवधे गावातील ग्रामस्थांना साध्या लोखंडी साकवावरून जावे लागत होते. या मार्गावर बावनदीचे मोठे पात्र आहे. येथील पुलासाठी ४ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पुलाची गरज असताना लोखंडी साकव उभारून आजपर्यंत या लोकांची बोळवण केली होती. या लोखंडी साकवाचे दगडी पिलरही शेवटची घटका मोजत आहेत. आमदार शेखर निकम यांनी यासाठी पाठपुरावा करत निवधे ते बामणोली नदीवरील पुलासाठी ४ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर केला. पूल नसल्यामुळे निवधे ग्रामस्थांना कोणी आजारी पडल्यास रुग्णाला पाठीवर घेऊन रस्त्यावर यावे लागत होते. पावसाळ्यातही हाल होत होते. पूल झाल्यास वाहने दारात येऊन मोठी गैरसोय टळणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 26-Apr-21