रत्नागिरी : रत्नागिरीत २४ एप्रिलला झालेल्या लसीकरण कार्यक्रमाला पूर्वनोंदणी करूनही कोरोनाप्रतिबंधक लस मिळाली नाही. त्याला छुपे लसीकरण कारणीभूत असावे, असा संशय असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. रत्नागिरी शहरातील एका मंगल कार्यालयात झालेले लसीकरण शासकीय होते की गैर शासकीय आयोजन होते, हे समजत नाही. शासकीय आयोजन असेल तर शासकीय यंत्रणेने ते जाहीर करायला हवे होते. लसीकरण विशिष्ट लोकांनाच उपलब्ध व्हावे, असा शासनाचा उद्देश होता का, असा प्रश्न अॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 26-Apr-21