रत्नागिरी : जिल्ह्यातील सात पोलिस उपनिरीक्षकांना सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली असून त्यांची बदली अन्यत्र केली आहे. राज्यातील ५३९ पोलिस उपनिरीक्षकांना एकाचवेळी गृह विभागाने बढती दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुप्रिया बंगडे यांची सहायक पोलिस निरीक्षकपदी कोकण विभागातच बदली झाली आहे. राजेश पन्हाळे यांची नागरी हक्क संरक्षण, जयश्री भोमकर, अश्विनी पाटील यांची कोल्हापूर, सागर चव्हाण यांची मिरा भाईंदर, सोमनाथ कदम यांची गडचिरोली, महादेव म्हस्के यांची कोकण विभागातच बढतीने बदली झाली आहे. बढतीने बदली झालेल्या सर्व सहायक पोलिस निरीक्षकांना तत्काळ नव्या नेमणुकीच्या ठिकाणी सोडावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 30-Apr-21