देशातील १८० जिल्ह्यांमध्ये गेल्या ७ दिवसांत कोरोनाची एकही रुग्ण नाही : डॉ.हर्षवर्धन

0

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढत होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. इतकंच नाही, तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढतो आहे. देशात दररोज ४ हजार रुग्णांचा मृत्यू होतोय. देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक वेगळीच आणि सकारात्मक माहिती दिली आहे. देशात गेल्या ७ दिवसांमध्ये एकूण १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या तीन आठवड्यांची आकडेवारी पाहता देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:30 PM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here