अंतिम वर्षाच्या परीक्षेत लोड शेडिंगची अडचण

0

बत्ती गुल झाल्याने अनेक विद्यार्थी चिंतेत

रत्नागिरी : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र आज महावितरण कडून करण्यात आलेल्या लोड शेडिंग मुळे या विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. आज रत्नागिरीतील विविध भागातील वीज पुरवठा मेंटेनन्स साठी बंद ठेवण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. अनेक मुले ग्रामीण भागातील देखील आहेत, या ठिकाणी देखील हीच समस्या आहे. वीज नसल्याने अनेकांची इंटरनेट सेवा देखील बंद आहे. रत्नागिरीच्या काही भागात मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्याने त्यांना केबल नेट घ्यावे लागले आहे. मात्र वीज प्रवाह खंडित झाल्याने ते देखील बंद आहे. अनेक महाविद्यालयांनी परीक्षा सुरू होणार असून वीजपुरवठा खंडित करू नये असे पत्र महावितरण ला दिलेले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून महावितरण ने आज मेंटेनन्स सुरू केला आहे. रत्नागिरी खबरदार ने देखील ही अडचण महावितरण अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे, आम्ही लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करतो असे त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:02 AM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here