वादळातही जिल्हा प्रशासनाची ग्रेट कामगिरी : ३५० रुग्णांना अखंडित प्राणवायू

0

रत्नागिरी : आधीच जिल्ह्यात वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि या संकटात भर पडली वादळाची. सोसाट्याच्या वाऱ्याने पोल पडून वीज प्रवाह खंडित होण्याची दाट शक्यता आणि अशावेळी व्हेंटीलेटर आणि आयसीयू मध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी प्रत्येक क्षण महत्वाचा होता. जिल्हा प्रशासनासमोर हे मोठे आव्हानच होते. हे आव्हान संपूर्ण यंत्रणेने लीलया पेलल्याचे दिसून आले. अठरा तास व्हेंटीलेटरवरील रुग्णाचा श्वास एक क्षण देखील थांबला नाही. जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हि कामगिरी फत्ते केली. जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात आयसीयूमध्ये ५० तर सुमारे २०० रुग्ण ऑक्सिजनवर होते. या काळात आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीला तोड नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:43 AM 19/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here