साडवली : पंचायत राज कायद्याच्या अस्तित्वापासून चालत आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द झाले ही आरक्षण विरोधकांची चाल आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ओबीसींनी वेळीच जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा ओबीसी जेव्हा जागे होतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, अशी भीती देवरूखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी व्यक्त केली आहे.याबाबत पत्रकारांशी बोलताना आर्ते म्हणाले, केंद्र सरकारने ओबीसींची स्वतंत्र जनगणना न केल्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. हा ओबीसींसाठी एकप्रकारे धक्काच आहे. तसेच या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसी स्वतंत्र जनगणनेद्वारे ओबीसींची संख्या लक्षात येणार असल्याने अशाच प्रकारची जनगणना न करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोपही आर्ते यांनी केला आहे. आता ओबीसींची स्वतंत्र जनगणना होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आग्रही भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही आर्ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 31-May-21