◼️ “ज्यांना अस्तिव नाही अशांनी जनतेची दिशाभूल करू नये”
➡ रत्नागिरी : बीजेपी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी ना. उदय सामंत यांच्यावर टीका करताच शिवसेना खवळून उठली आहे. शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी आक्रमक होत दीपक पटवर्धन यांना आव्हानच दिले आहे. एका वर्षात रत्नागिरी शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलला असेल असा विश्वास बिपीन बंदरकर यांनी व्यक्त केला आहे. पुढच्या वर्षी याच तारखेला सर्व कामे पूर्ण असणार, असे झाल्यास पटवर्धनांनी शिसेनेत प्रवेश करावा नाहीतर मी शिवसेना सोडून भाजप मध्ये प्रवेश करणार असे वक्तव्य बिपीन बंदरकर यांनी केले आहे. दीपक पटवर्धन यांनी आव्हान स्वीकारावे, भाजपचे नगरसेवकांनी आडकाठी आणली नसती तर रत्नागिरी शहरातील लोकांना एकवर्षं अगोदर पाणी मिळालं असत. दीपक पटवर्धन यांनी नगरसेवक म्हणून निवडून येऊन दाखवावे, ज्यांना अस्तित्व नाही त्यांनी दिशाभूल करू नये, असा सल्ला शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:46 PM 11-Jun-21