“नाना पाटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण…”

0

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि विरोधक अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांसमोर ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोना संकट अद्यापही कायम असताना दुसरीकडे निवडणुका आणि राजकारण यांवरून पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. यातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा नुकतीच काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता अन्य पक्षांकडूनही भूमिका मांडल्या जात असून, संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ”नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय. राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं. जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे”, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून चिमटा काढला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here