मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, दोन्ही राजेंनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 15-Jun-21