रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या हि आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली होती. आता मात्र वाढविण्यात आलेल्या कोरोना तपासणीमुळे जिल्ह्याचा कोरोना पोझिटिव्हिटी उतरत असल्याचे दिसत आहे. मात्र तरीदेखील येथील आरोग्य यंत्रणेला अधिक चांगले मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्यातील ४ तद्न्य डॉक्टरांची टीम रत्नागिरीत दाखल झाल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. डॉक्टर आकाश परब, डॉ. अमर चव्हाण, डॉ. वाघेला, डॉ. सुहास सेजल यांनी अन्य जिल्ह्यात अतिशय चांगले काम केले असून हे चारही डॉक्टर पुढील १५ दिवस रत्नागिरीत राहून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणार असल्याची माहिती ना सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
04:03 PM 17/Jun/2021