अजगराला जाळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

राजापूर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार अजगराला मारून जाळल्या प्रकरणी नाटे-पडवणेवाडी येथील विजय भिकाजी पारकर(५३ वर्षे), वंदना विजय पारकर (४४ वर्षे), मानसी मंगेश पारकर (२७ वर्षे) या तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यात अजगराला मारून जाळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी वन विभागाने तातडीने सूत्रे हलवून कोल्हापूरचे व्ही क्लेमेंट बेन मुख्य वनरक्षक, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले सागर पताडे, संजय रणधीर यांनी चौकशी सुरू केली. त्यामध्ये केलेल्या चौकशीमध्ये दि. २२ जून रोजी सायंकाळी कोंबडीला अजगर खात असल्याचे दिसल्यानंतर अजगरास मारले. नारळाच्या झावळ्या टाकून अर्धवट जाळून तसेच जळताना त्याचा व्हिडीओ केला आणि अर्धवट जळलेला अजगर व कोंबडी त्यांच्या घरामागे असलेल्या ओढ्याजवळ नेऊन टाकल्याची माहिती संबंधित संशयितांनी दिल्याची माहिती वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून हा जाळलेला अजगरही वनविभागाने ताब्यात घेऊन त्याचे राजापूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले. दरम्यान संबंधित वन्यप्राणी मनुष्य वस्तीनजीक आल्यास किंवा वन्यजीव संकटात सापडल्यास त्यासंबंधी वन विभागाला तातडीने माहिती देण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here