पोटनिवडणुका पुढे ढकलाव्या, राज्य सरकार निवडणूक आयोगाला करणार विनंती

0

मुंबई : कोरोनाच्या प्रभाव असतानाच ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका पुढे ढकलाव्या, यावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बुधवारी चर्चा झाली असून त्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला करणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे राज्य निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पुढील महिन्यात १९ जुलै या दिवशी पोटनिवडणुकीसाठीचे मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० जुलैला निकाल जाहीर होणार आहेत. रोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी, पंढरपूरची वारीदेखील मर्यादित स्वरुपातच होणार आहे. राज्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कार्यक्रमही जर कोरोनाच्या कारणामुळे मर्यादित स्वरुपात घेतले जात असतील, तर या काळात पोटनिवडणुका घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाकडे मांडली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here