जिल्ह्यात 423 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 16 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात मागील 24 तासात 364 आणि त्यापूर्वीचे 59 असे एकूण 423 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.87 टक्के आहे.

तर जिल्ह्यात 24 तासात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात 7, राजापूर 3, लांजा 1, खेड 1, चिपळूण 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 3 मृत्यू झाले आहेत. 16 जणांच्या मृत्यूंमुळे जिल्ह्याचा मृत्युदर 2.86 टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 805 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात 5 हजार 601 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर याच कालावधीत 388 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात सध्या 6102 रुग्ण सक्रीय आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:45 PM 02-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here