फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही, भास्कर जाधवांचा नितेश राणेंवर पलटवार

0

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे. त्यावरुन, आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. विधानसभेतील 12 आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी सरकारवर प्रहार केला. नितेश राणे म्हणाले की, आमचे १२ आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांचे निलंबन करण्यात आले. आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली होती. नितेश राणेंच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे जाधव यांनी म्हटले.
मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नितेश राणेंना फडतूस म्हणत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 07-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here