खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेला तुळशी-विन्हेरे-महाड रस्ता पावसाळ्यात सुस्थितीत ठेवून कुठलाही अडथळा होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. या मागणीचे निवेदन कोकण विकास समितीचे मारुती जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता यांना नुकतेच दिले. तुळशी-विन्हेरे-महाड या रस्त्याची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून वाहने हाकताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे कशेडी घाटात एखादी दुर्घटना घडल्यास पर्यायी रस्ता म्हणून हा मार्ग सोयीस्कर ठरतो. या पार्श्वभूमीवर हा मार्ग सुस्थितीत ठेवून वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 13-Jul-21