मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

0

रत्नागिरी : मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 13 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड तालुक्यात मौजे अडखळ येथील बंडू यशवंत हिलम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 47 हजार 900 रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवती हानी नाही. दापोली तालुक्यात मौजे भडवळे येथील ओंकार रामचंद्र खरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 25 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. चिपळूण तालुक्यात मौजे कापसाळ येथील सुरेखा सुरेश साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 6 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील केतन नवनाथ भोसले वय वर्षे 34 हे 11 जुलै 2021 रोजी कातलवाडी नदीवर पोहण्यासाठी गेले असता बुडून मृत्यू झाला. मौजे पडवे येथील वसंत गणपत राऊत यांच्या 3 म्हैशी पऱ्यात पडून त्यातील 1 मृत्यू व 2 जखमी, अंशत: 1 लाख 50 हजारांचे नुकसान. संगमेश्वर तालुक्यात मौजे कोळंबे येथील बंडू लिगांयत यांच्या पडवीचे पावसामुळे अशंत: 30 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे पाटगाव येथील रामचंद्र सोनू पागार यांच्या विहिरीचे पावसामुळे अंशत: 40 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. राजापूर तालुक्यात मौजे तळवडे येथील बाबाजी गोरे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:18 PM 13-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here