सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर

0

सिंधुदुर्ग : वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते. मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी मध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात ना. उदय सामंत व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार नीट परीक्षेची देशात नवीन 55 केंद्रे मंजूर करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:16 PM 13-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here