जळगाव : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावरून मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राठोड जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना, मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केल्यानंतर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातही काही बदल केले जाणार असल्याची चर्चा आताच्या घडीला राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून अनेक शक्यताही वर्तवल्या जात आहे. यातच राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड अजूनही मंत्रिमंडळाबाबत आशावादी असल्याचे पाहायला मिळत आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राठोड म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:01 PM 19-Jul-21