रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरड कोसळून, पाणी साचून ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 19 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. दापोली तालुक्यात मौजे दाभोळ येतील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: 22 हजार रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. संगमेश्वर तालुक्यात मौजे धामापुर येथे 18 जुलै 2021 रोजी दुपारी 03.00 वा. दरम्यान शैलेश दत्ताराम चव्हाण, वय वर्षे 33 व चेतन सुरेश सागवेकर वय वर्षे 18 हे नदीवर पोहायला गेले असता नदीत बुडून मयत झाले. रत्नागिरी तालुक्यात मौजे गोळप येथे जमीन खचल्याने सावधगिरीचा उपाय, 3 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहेत. राजापूर तालुक्यात मौजे नाटे येथील ठाकरेवाडी जवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:06 PM 19-Jul-21