पुराच्या पाण्याखाली राहिल्याने शीळ-चिखलगाव मार्ग धोकादायक

0

रत्नागिरी : राजापूर शहरानजीकच्या शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव मार्गावर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी सातत्याने राहिलेल्या पुराच्या पाण्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. रस्त्यालगतची दरड आणि मोठी झाडेही कोसळली आहेत. दरडीचा काही भाग आणि मोठमोठे दगड कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अर्जुना नदीवर मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक मोठा पूल या ठिकाणी उभारला जात असून या पुलासाठी उंच डोंगरावर आणि नदीपात्रात मार्गाच्या लगत उभारण्यात आलेल्या दोन्ही खांबांमुळे या मार्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शीळ-चिखलगाव मार्गाकडील पिलर अवघ्या दहा ते पंधरा फूट अंतरावर असून पिलरच्या रस्त्याकडील बाजूने नदीचा प्रवाह वेगात येत असल्याने मुळातच अरुंद असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. त्यामध्ये रस्ता कधीही वाहून जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्यालगतच्या उंच दरडीजवळून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत येत आहे. त्यामुळे त्या भागातील दरडीची धूप झाली असून मोठमोठे दगड मोकळे झाले आहेत. ते दगड किंवा संपूर्ण दरडच कोसळण्याचा धोका आहे. नदीकडील बाजूला संरक्षक भिंत उभारण्यासह डोंगराच्या बाजूने संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 27-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here