गाडी बाजूला न घेतल्याच्या रागातून चौघांना मारहाण

0

साखरपा : सुमो गाडी बाजूला न घेतल्याच्या रागातून चौघांना काठीने मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक सुर्वे (रा. तिवरे मेढे संगमेश्वर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून जखमी असलेल्या चौघांवर उपचार सुरु आहेत. विवेक सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे व मारहाण करणाऱ्या संशयीत आरोपींचे गेले अनेक वर्ष जागेवरुन वाद सुरु आहेत. ते एकाच वाडीत रहात असले तरी गेले अनेक वर्ष बोलत नाहीत. दि.२६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास विवेक सुर्वे यांची बहिण सायली सुर्वे हे दोघे काजळी नदीच्या पुलाजवळ सुमो गाडी धूत होते. यावेळी दत्ताराम सुर्वे व अनिष सुर्वे हे दोघे दुचाकीवरुन आपल्या घरी जात होते. यावेळी विवेक सुर्वे यांनी जरा थांबा गाडी बाजूला घेतो असे सांगितले. मात्र ते न थांबता पुढे जाऊ लागले. यावेळी त्यांची दुचाकी घसरल्याने दोघेही गाडीवरुन खाली पडले. या रागातून अनिष सुर्वे याने त्यांना मारहाण सुरु केली.
या घटनेची माहिती मिळताच जयवंत सुर्वे, मनिष सुर्वे तेथे आले. मनिष सुर्वे यांने घरातून काठी आणून विवेक सुर्वे यांच्यासह त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या वेदिका सुर्वे, सायली सुर्वे, अर्चना सुर्वे यांना ही मारहाण केली. विवेक सुर्वे यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी दत्ताराम सुर्वे, जयवंत सुर्वे, अनिष सुर्वे, मनिष सुर्वे रा. तिवरे मेढे यांच्या विरोधात भादंविक ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हे.कॉ.मारळकर करत आहेत.

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 28-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here