जिल्ह्यात कोरोनाने 13 जणांचा मृत्यू; 282 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज आलेल्या अहवालानुसार कोरोनामुळे 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 13 पैकी 9 मृत्यू पूर्वीचे व 4 मृत्यू मागील 24 तासातील असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच नव्याने 282 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 282 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 70 हजार 793 झाली आहे. नव्याने सापडलेल्या 282 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 195 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 87 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

24 तासात 631 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 93.93 टक्क्यांवर आहे. जिल्ह्याचा मृत्युदर मागील आठवड्यात 2.82 टक्के इतका होता. हा मृत्युदर या आठवड्यात 2.87 टक्क्यांवर आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:09 PM 28-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here