रत्नागिरी बसस्थानक आणि शहरातील रस्ते सुधारण्याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी समविचारी २ ऑगस्टला थाळीनाद आंदोलन करणार

0

रत्नागिरी : रत्नागिरी बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्ते सुधारणा करण्याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने येत्या २ ऑगस्ट रोजी थाळीनाद आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे बांधकाम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे. त्याशिवाय गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाही शहरातील रस्ते पूर्णत्वास जात नाहीत. या विषयी संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने रत्नागिरी येथील बस स्थानकासमोर सोमवार दि. 02-08-21 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळात थाळीनाथ आंदोलन करण्यात येणार आहे. वरील प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे असून या विषयी जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे तरी समविचारीने निपक्षतेने आयोजिलेल्या या आंदोलनात तमाम रत्नागिरीकर, समाजसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:19 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here