मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसांचा मराठवाडा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्यात ते उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेणार आहेत. हे सरळ सरळ राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण आहे, असे म्हणत मंत्रिमंडळ बैठकीत या दौऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या सचिवांना वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी, असेही बैठकीत ठरल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. कोश्यारी मुख्यमंत्री नाहीत, ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी राज्यघटनेने स्थापन झालेल्या व लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये, असेही मलिक म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 04-Aug-21