ना.उदय सामंत यांच्या आश्वासनामुळे एनएचएम कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

0

रत्नागिरी: जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात होते; परंतु उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनामुळे या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. जिल्हा शासकीय रुग्णालयात एनएचएम अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंदचा इशारा दिला होता. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here