एसटी कर्मचाऱ्यांचा २७ ऑक्टोबरपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा

0

रत्नागिरी : गेल्या अनेक महिन्यांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोना काळात प्रामाणिकपणे सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. या वर तोडगा काढण्यासाठी आपल्या एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या बाबतची माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here