रत्नागिरी जिल्हा नूतन काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड यांनी जाणून घेतल्या कार्यकर्त्यांच्या भावना

0

रत्नागिरी : काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आणि समस्या समजून घेतल्या. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लाड यांनी येथील काँग्रेस भवनात बैठक घेतली. यापुढे होणाऱ्या निवडणुका स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विचारात घेऊनच लढविल्या जातील. आघाडी करायची की नाही, हे तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर अवलंबून असेल. काँग्रेस भवन येथे महा ई सेवाकेंद्र चालू करून गावागावांतून, जिल्ह्यातून येणाऱ्या जनतेला पाहिजे ती कागदपत्रे, सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे लाड यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here