देवरूख : महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीच्यावतीने ३१ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर तालुका जनसंपर्क जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंचाचे तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्नांना स्थानिक तालुका स्तरावर दाद मिळत नाही. कितीतरी सार्वजनिक कामे निधी मंजूर असूनही कार्यवाही होत नाही. यासाठी नागरिकांच्या योग्य पद्धतीने तक्रारी स्वीकारून संबंधित विभागाकडे दाद मागण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. तरी रविवार ३१ रोजी सकाळी १० वाजता कुलस्वामिनी अपार्टमेंट फ्लॅट नं. ११३, छ. शिवाजी विद्यामंदिर शाळा क्र. ४ जवळ, मु. पो. देवरूख मधली आळी येथे उपस्थित रहावे, येताना पुरावे घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 27-Oct-21
