मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि अर्थचक्रास चालना देण्यासाठी राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल डिस्टंसिन्ग आणि मास्क लावणे बंधनकारक असताना काही लोक निष्काळजीपणाने वागत असल्याचे निर्दशनास आले. ज्यामुळे राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी आता सक्षम प्राधिकारी, राज्य व्यवस्थापन समिती यांना मिळालेल्या अधिकारानुसार आदेश पारित करण्यात आले आहे. राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, 1897 व आपत्ती निवारण कायदा, 2005 ची अंबलबजावणी सुरु आहे. याअंतर्गत मंत्रालय आणि सर्व शासकीय आस्थापनांमध्ये पूर्णवेळ मास्कचा लावणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील मंत्रालय व खाजगी कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाक-तोंड पूर्णत: झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच राज्यातील मंत्रालय व खाजगी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लशींच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. याची खात्री संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी, असेही आदेश देण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 27-Oct-21