➡ दापोली : तालुक्यातील उंबर्ले येथे दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नीलम जालगावकर आणि मेघा सुतार यांच्या मार्फत नारळ रोपांची लागवड करण्यात आली. तसेच नारळाचे झाड हे कल्पवृक्ष आहे. त्यानुसार त्याच्या प्रत्येक भागाचा किती उपयोग होतो याची सविस्तर माहिती या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना दिली. उंबर्ले येथील शेतकरी सखाराम जालगावकर यांच्या जागेत नारळाच्या रोपाची लागवड करण्यात आली. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी नारळाविषयी विस्तृत माहितीही सांगितली
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 27-Oct-21