मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच गाजतंय. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB नं अटक केली. त्यानंतर देशभरात याची चर्चा सुरु झाली. २ ऑक्टोबरला आर्यनला ताब्यात घेतलं त्यानंतर कोर्टाने अनेकदा जामीन फेटाळला. त्यानंतर अखेर २८ ऑक्टोबरला हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादी, शिवसेनेला खोचक सवाल विचारले आहेत. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का? असं भाजपानं विचारलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 29-Oct-21
