मुंबई : क्रूझवरील ड्रग पार्टीवर कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दररोज गंभीर आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनी आता आयोजकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्या पार्टीचं आयोजन करणाऱ्या काशिफ खानला वानखेडेंनी अटक का केली नाही?, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला. वानखेडे आणि काशिफ खान एकमेकांचे चांगले मित्र असल्यानंच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर आता वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. कायदा आपलं काम करेल, अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली. मलिकांच्या आरोपांवर त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या असून एनसीबीनं त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडूनही त्यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी एका टीमची स्थापना करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 29-Oct-21
