मुंबई : क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “क्रांती रेडकर यांच्या विषयी आम्हाला प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. साहेब जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. ठाकरे सरकार आहे, पवार साहेब आहेत. सगळं व्यवस्थित आहे. कोणावर अन्याय होणार नाही.” तर समीर वानखेडे यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर विचारल्यानंतर संजय राऊत यांनी बोलणं टाळलं. ते म्हणाले की, “गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही, कारण तो सरकारचा विषय आहे.”
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 29-Oct-21
