रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. एकेकाळी जिल्ह्यातील ताकदवान पक्ष म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रवादी पक्ष आज राज्यातील सत्तेत असूनही कोकणात प्रचंड प्रमाणात दुबळा आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी त्याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक तालुक्यात परस्परविरोधी पक्षांतर्गत गट हे पक्षाचे नुकसान करीत असल्याची भावना कार्यकर्त्यात आहे. आज रत्नागिरी दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वेगळा संवाद साधून त्यांनी वार्तालाप केला आणि त्यांची चांगलीच हजेरी घेतल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:18 PM 29/Oct/2021
