रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 17 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात 24 तासात 27 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 264 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.66 टक्के आहे. नव्याने 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 896 इतकी झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 72 तर संस्थात्मक विलगीकरणात 86 रुग्ण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:17 PM 29-Oct-21
